रवी शास्त्री यांच्या या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले, सचिन तेंडुलकरने केला खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव असल्याचे म्हटले जाते, परंतु सचिनच्या कारकीर्दीतली पहिली कसोटी योग्य नव्हती, कारण त्याला पहिल्याच सामन्यात वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना करावा लागला होता.त्याबाबत,सचिनने म्हटले आहे की भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एका सूचनेने सर्वकाही बदलले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

स्काय स्पोर्ट्सवरील ‘सचिन मीट्स नासिर’ च्या एपिसोडमध्ये सचिन म्हणाला, “मला काहीच माहिती नव्हते आणि मला ते मान्य करावेच लागेल.मी पहिला कसोटी सामना असा खेळलो जसा कि तो एखाद्या शाळेचा सामना आहे.”

तो म्हणाला, “वसीम आणि वकार वेगवान गोलंदाजी करत होते आणि त्यांच्या लहान चेंडूंची मला भीती वाटत होती. मला यापूर्वी असे कधीच वाटले नव्हते, त्यामुळे पहिला सामना आनंददायी नव्हता.त्यांच्या वेगवान आणि बाउंसरवाल्या गोलंदाजीमुळे आणि शेवटी मी १५ धावांवर बाद झालो. मला वाटले की हा माझा पहिला आणि शेवटचा सामना आहे. मी खूप उदास होतो. “

सचिनची ही अस्वस्थता पाहून त्याच्या संघातील खेळाडू असलेले शास्त्री त्याच्याशी बोलायला आले.सचिन म्हणाला, “संघातील सदस्यांना याची जाणीव झाली. शास्त्री यांच्याशी मी केलेली चर्चा मला अजूनही आठवते.तो मला म्हणाला – तू शाळेच्या सामन्याप्रमाणेच खेळला होतास.तुला हे लक्षात ठेवावेच लागेल की आपण जगातील उत्कृष्ट गोलंदाजांविरुद्ध खेळत आहोत.आपण त्यांच्या क्षमतेचा आणि त्यांच्या कौशल्यांचा आदर करण्याची गरज आहे. “

माजी फलंदाज पुढे म्हणाला, “मग मी रवीला सांगितले की मी पाकिस्तानी गोलंदाजांचा वेगाला घाबरतोय.त्याने मला सांगितले की तसे होतच असते आणि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.तुम्हाला फक्त अर्धा तास क्रीजवर घालवणे आवश्यक आहे. आणि मग आपण त्यांच्या वेगवान माऱ्याला व्यवस्थित खेळू शकाल आणि सर्वकाही योग्य होईल. “शास्त्रीच्या सल्ल्यानंतर सचिनने फैसलाबादमध्ये खेळल्या जाणार्‍या पुढच्या सामन्यात ५९ धावांची खेळी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment