चीन-भारत वादामुळे शाओमीचे झाले मोठे नुकसान, सॅमसंग बनला स्मार्टफोन बाजाराचा राजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारतीय सैनिकांसह झालेल्या झटापटीनंतर चीनबद्दल आपल्या लोकांचा रोष उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत भारतीयांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार (Chinese Goods Bycott) टाकण्यास सुरवात केली आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्मार्टफोन मार्केटवर (Smartphone market) दिसून येतो आहे. काउंटर पॉइंटच्या अहवालानुसार सॅमसंगने चीनी कंपनी झिओमीला मागे टाकत स्मार्टफोन मार्केटवर अधीराज्य स्थापन केले आहे, खरं तर सॅमसंग स्मार्टफोन मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

चिनी कंपन्यांना भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे – जूनमध्ये चीनच्या सैनिकांनी लडाखच्या गॅल्वान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांसह पाशवी कृत्य केले. ज्यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले. तेव्हापासून देशात अँटी चायना सेंटीमेंट सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सॅमसंग आणि इतर ब्रँडसह जे चिनी नाहीत अशांना या गोष्टींचा बराच फायदा होत आहे.

सॅमसंगने जागतिक बाजारपेठेतही चिनी कंपन्यांना मागे टाकले – स्मार्टफोनच्या जागतिक बाजारपेठेत सॅमसंगने चिनी ब्रँड हुआवेईवर मात केली आहे. अहवालानुसार, ऑगस्ट 2020 पर्यंत सॅमसंगने जागतिक बाजारपेठेत 20 टक्के हिस्सा मिळवला आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत चिनी कंपनी हुआवेईचा वाटा केवळ 16 टक्केचआहे.

Apple चे मोठे नुकसान – Apple यापूर्वी आपला पहिला 5G आयफोन बाजारात आणला. घटनेपूर्वी अमेरिकेच्या शेअर बाजारावर कंपनीच्या शेअर्समध्ये 4% पर्यंत घसरण झाली. यामुळे कंपनीची व्हॅल्युएशन 81 अब्ज डॉलर्स (5.94 लाख कोटी रुपये) कमी झाले. मात्र, बाजारपेठ बंद होईपर्यंत शेअर्स मध्ये किंचित सुधारणा झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment