बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठात शोकसभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दापोली : आंबेनळी अपघातग्रस्तांना आज दापोली कृषी विद्यापीठाने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेतली. आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रु अनावर झाले. शोकसभेतून सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच काळजावर दगड ठेऊन विद्यापीठाच्या कामकाजाला सुरुवात करत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.
२८ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंबेनळी घाटात मिनी बसचा अपघात झाला होता त्यात ३० व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता तर एका व्यक्तीने गाडी तून उडी घेतल्याने तो बचावला होता.एकाच वेळी ३० व्यक्ती ठार झाल्याने दापोली शहरावर शोककळा पसरली होती.

Leave a Comment