भारत-चीन मुद्द्यावरील सर्वपक्षीय बैठक संपली; राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत निवेदन देणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) दोन्ही देशांच्या सैनिक आमने-सामने आहेत. लडाखमधील या तणावाच्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. आता ते उद्या ११ वाजता राज्यसभेत निवेदन देणार असल्याचे सांगितले जात आहे.

लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. चीनशी सुरू असलेल्या तणावावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं होतं. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारत-चीनमधील तणावावर सरकारने लोकसभेत निवेदन दिलंय. पण यावर विरोधी पक्षांनी सविस्तर चर्चेती मागणी केली. ही मागणी फेटाळल्याने काँग्रेसने लोकसभेतून सभात्याग केला होता. पण सरकारकडून चर्चेसाठी ही बैठक बोलवण्यावर भर देण्यात आला.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि प्रश्नोत्तराचा तास रद्द केला गेला. त्यावर काँग्रेस, टीएमसीसह अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला. चीनच्या मुद्द्यावर सरकारने चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप त्यांनी केला. लडाखची परिस्थिती गंभीर आहे आणि एलएसीची सद्य स्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील निवेदनात दिली. हा वाद वाटाघाटीद्वारे सोडवायचा आहे. पण परिस्थिती बदलल्यास भारतीय सैन्य सज्ज आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. चीनशी सुरू असलेल्या तणावावर सरकार देशाची दिशाभूल करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हे चीनला घाबरत आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली. केंद्रातील मोदी सरकारने चीन मुद्द्यावर वेगवेगळी विधानं केल्याचा दावा, राहुल यांनी बुधवारीही केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment