१६.८४ लाख करदात्यांना २६ हजार २४२ करोड रुपयांचे आयकर रिफंड मिळाले माघारी – आयकर विभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर विभागाने शुक्रवारी एप्रिलपासून सुमारे १६.८४ लाख करदात्यांना २६,२४२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर रिफंड केल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटात लोकं आणि कंपन्यांना तत्काळ लिक्विडिटी देण्यासाठी कर विभागाने ही रिफंड प्रक्रिया तातडीने जारी केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अहवाल दिला की,’ १ एप्रिल ते २१ मे दरम्यान सुमारे १६,८४,२९८ करदात्यांना आयकर रिफंड मिळाला आहे.

सीबीडीटीने एक निवेदन देताना असे म्हंटले आहे की, ‘१६,८४,२९८ करदात्यांना सुमारे १५,८१,९०६ कोटी रुपये प्राप्तिकर रिफंड मिळालेला आहे आणि ११,६१० कोटी रुपयांचे कॉर्पोरेट टॅक्स रिफंड १,०२,३९२ निर्धारकांना मिळाला आहे. गेल्या आठवड्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेल्या घोषणेनंतर या रिफंडच्या प्रक्रियेस वेग आला आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही रिफंड देण्यास उशीर करत नाही आहोत. आम्ही ते तातडीने देऊ, कारण अद्यापही लोकांना लिक्विडिटीची आवश्यकता आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की,’१६ मे रोजी पूर्ण झालेल्या आठवड्यात त्यांनी ३७५३१ निर्धारकांना सुमारे २०५०.६१ कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली होती. तसेच २,८७८ कॉर्पोरेट कर निर्धारकांना ८६७.६२ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.

सीबीडीटीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘२१ मे रोजी पूर्ण झालेल्या आठवड्यात म्हणजेच १७ ते २१ मे दरम्यान २,६७२.९७ कोटी रुपयांचे रिफंडस मंजूर करण्यात आले आहेत. यासह ट्रस्ट, एमएसएमई, मालकी, भागीदारीसह ३३७७४ कॉर्पोरेट निर्धारकांना सुमारे ६७१४.३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशाप्रकारे १,५६,५३८ कर निर्धारकांना रिफंड म्हणून एकूण ९३८७.३१ कोटी रुपये दिले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment