हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख नजीकच्या हरपुडे येथील तरूणाच्या घरात तब्बल १८ जिवंत गावठी बाँम्ब सापडल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरेश आत्माराम किर्वे (वय-४८रा. हरपुडे, मराठवाडी) या तरूणाला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडे ९ हजार रुपये किमतीचे १८ गावठी बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेऊन मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून या संशयितावर देवरुख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दहशदवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.