‘या’ कारणामुळे शिरसोली येथील 22 वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव तालुक्यातील शिरसोली या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. मृत प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासोबत शिरसोली या ठिकाणी राहत होत्या. अजय बारी हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. त्यामुळे ते आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. मृत प्राजक्तासोबत तिचे सासू,सासरे, दीर आणि त्यांची बायको राहत होते.

मृत प्राजक्ताने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीच्या सहाय्य्यने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. प्राजक्ता हिने आत्महत्या केलेली नसून तीचा खून करण्यात आला असल्याचा आरोप प्राजक्ताचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे यांनी केला आहे. यामुळे विवाहितेचे पती आणि सासरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्राजक्ताच्या माहेरच्यांकडून करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment