दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. त्यात औरंगाबादसह जालना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील औरंगपुरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, बजाजनगर, सिडको, उल्कानगरी, कोकनवाडी, पैठण, एन-८ सिडको, एन -४ सिडको, गारखेडा, सिल्लोड येथील रुग्णांचा समावेश आहे. तर  जालना जिल्ह्यातील दोन रुग्णांचा सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत घाटी रुग्णालयात ३४१३ रुग्णांना सुटी देण्यात आली असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment