मुंबईतील ट्रॅफिकमुळे 3 टक्के जोडप्यांचे घटस्फोट होतात; अमृता फडणवीसांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील वाहतूक कोंडी मुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी राज्य सरकार वर देखील निशाणा साधला. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त वसुली सरकार आहे. जनतेला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे याची काहीच सरकारला पडलेली नाही. जगही बोलू लागलंय की राज्यसरकारकडून दुजाभाव सुरू आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Leave a Comment