कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीला 40 कोटींचा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या पावणेती महिन्यात तब्बल 40 कोटीपेक्षा अधिक फटका औरंगाबाद विभागाला बसला आहे. दुसरीकडे रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अधिकाधिक एसटीबसेस चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दररोज तब्बल दोनशेपेक्षा अधिक बस सुरु झाल्या आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलनीकरण करावे यासठी गेल्या जवळपास अडिच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संपापुर्वी औरंगाबाद विभागात दररोज साधारण पन्नास लाखाचे उत्पन्न होते. त्यामुळे विभागात गेल्या 81 दिवसात अंदाजे 40 कोटी पेक्षा अधिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे कामावर रुजू झालेल्या कर्मचारी, सेवा निवृत्त आणि खाजगी एजन्सी मार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने शनिवारी दिवसभरात विविध मार्गावर 209 बसेस चालवण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांच्या 580 फेऱ्या करण्यात आल्याची माहिती नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.

दरम्यान, एसटीचे राज्यशासनात विलिनीकरण करावे यासाठी संपकरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठामच आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत आतापर्यत 88 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

 

Leave a Comment