पावसाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाख तर पूरबाधित कुटुंबाला 10 हजारांची मदत : विजय वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यात पावसाच्या, भूस्खलनाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने 5 लाखाची तर पूर बाधित कुटुंबीयांना 10 हजार रुपये तातडीची देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केले.

पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे त्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आतापर्यंत 150 लोकांचा जीव गेला आहे. गेल्या 40-50 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडल्याने भूस्खलन, दरडी पडणे अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. आता या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न वर्षभरात मार्गी लावला जाईल.

गैरमार्गाने जमिनी बळकविणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

राज्यात पुनर्वसनाचा प्रश्न मिटत नाही यांचा अर्थ धरणग्रस्तांची जागा गैरमार्गाने बळकावली आहे. तसेच पुनर्वसनात अपात्र असणाऱ्यांनी लाभ घेतला असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जमिनी परत घेतल्या जातील, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Leave a Comment