पर्यटन राजधानीसाठी सरकारचा 500 कोटींचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्राची पर्यटन राजधानी तसेच मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने 500 कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल दिली.

औरंगाबाद साठी किमान 500 कोटींचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 3 जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 21 जानेवारीच्या नियोजन विभागाच्या बैठकीत खो दिला होता.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत पालकमंत्री देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने 500 कोटींचा प्रारुप आराखडा सादर केला होता. परंतु कोवीड, महसुलात घट इत्यादींमुळे 70 कोटी अधिक देत 385 कोटींच्या प्रारुप आराखड्यास अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.

Leave a Comment