पुन्हा अस्मानी संकट! अमरावती जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस; रब्बीचं पीक सुद्धा गेलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
शेतकऱ्याच्या शेतमालाला एकीकडे भाव नाही आणि दुसरीकडे निसर्ग देखील बळीराज्यावर कोपला आहे. त्यातच रविवारी ४ वाजेच्या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडच पाणी पळालं आहे.

या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात काढणीवर असलेल हरभरा, गहू आणि कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाने रविवारी विदर्भात पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली. असाच अवकाळी पाऊस सुरू राहिल्यास रब्बी हंगामातील पिकाच नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे.

आधी दुष्काळ नंतर अतिवृष्टि आणि आता अवकाळी यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी पुरता वैतागला आहे. पिकासाठी खर्च करायचा आणि ऐन काढणीत आलेलं पीक निसर्ग हिरावून घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. या सगळ्यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment