संबधितावर गुन्हा दाखल : शर्यतीच्या बैलाची हत्या नाही, अपघातात मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न

crime

सातारा | जावली तालुक्यातील सरताळे येथे एका शर्यतीच्या बैलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्या बैलाची हत्या झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत होते. कारण या बैलाचे पाय मोडले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासात या बैलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बैल पुणे ग्रामीण हद्दीतील किकली या गावचा आहे. काही दिवसांपूर्वी सरताळे येथे एका बैलाचा मृतदेह … Read more

शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून … Read more

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू … Read more

पीक विम्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल

crop insurance

उस्मानाबाद | शेतकऱ्याच्या हक्काचे खरीप हंगाम 2020 पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी कृषी व महसूल मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कृषी आयुक्तांनी तीन दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा नोटिसा विमा कंपन्यांना दिल्या. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही अखेर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार ज्ञानराज चौगुले … Read more

कृषी विभागाची मोठी कारवाई : विनापरवाना 21 लाखांचा खतांचा मुद्देमाल जप्त

सांगली | खरीप हंगामसाठी शेतकऱ्यांना खते रास्त दरात व गुणवत्ता पूर्ण उपलब्ध करुन देण्याकरिता तसेच विक्रेत्यांनी या निविष्ठांची शेतकऱ्यांना जादा दराने खते विक्री करू नये. खतांचा काळाबाजार करू नये तथा भेसळ युक्त खते शेतकऱ्यांना विक्री होऊ नये यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने 11 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी सांगली येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल … Read more

72 वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; चाऱ्याच्या गंजीला लागली होती आग

fire

औरंगाबाद | जिल्ह्यातील आडुळ या गावांमधील एका शेतकऱ्याच्या चाऱ्याची गंजी व कपाशीच्या फसाटीला आग लागली होती. शॉर्टसर्किटने लागलेल्या या आगीत बहात्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव शिवारात गुरुवारी (दि. 10) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पंढरीनाथ अश्रुबा खाडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. खोडेगाव येथील शेतकरी पंढरीनाथ खाडे यांची बेंबळ्याचीवाडी … Read more

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कृषी दुकानांवर कारवाई न झाल्यास कृषी अधिकाऱ्यांना बळीराजा संघटनेचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बोगस बियाणे आणि चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कृषी दुकानांवर भरारी पथकांद्वारे कारवाई करावी. या प्रकाराकडे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्यास त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना … Read more

गेल्या वर्षीची चूक टाळण्यासाठी सोयाबीन बियाणांची कृषी विभागाकडून तपासणी

soyabean

औरंगाबाद | सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात येऊ नये म्हणजेच गेल्या वर्षीची पुनरावृत्ती टाळण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कंबर कसली आहे. खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची नमुने घेण्यासाठी कृषी विभागाची पथके तैनात केली आहेत. औरंगाबाद परभणी व नागपूर येथील प्रयोगशाळेत बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी सुरू असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली … Read more

वीज पडून 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू; मका पेरताना घडली घटना

औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजेदरम्यान वारा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून बाभुळगाव तरटे येथील 18 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 21 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. याच दरम्यान, लोहगड नांद्रा येथे वीज कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. समृद्धी विष्णू तरटे (वय 18) असे ठार झालेल्या तरुणीचे … Read more

रयत क्रांतीचे दूध दरासाठी सरकार विरोधात गुरुवारी चाबूक फोड आंदोलन : सदाभाऊ खोत

Sadhbhau Khot

सांगली | पशुधनाचा उत्पादन खर्च वाढत असताना दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे आर्थिक कोंडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारकडून दूध दरवाढीसाठी धोरण राबविले जात नाही, तर महानंदा भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. दुग्ध व पशुसंवर्धन खाते बंद करुन दुधाला एस.एम.पी. जाहीर करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्य सरकारविरोधात संपूर्ण राज्यभर चाबूक फोड आंदोलन केले … Read more