PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेले आहेत.

डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीने लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जातात. त्याचा फायदा पाहून अनेक शेतकरी संघटनांकडून त्याची रक्कम वार्षिक 24 हजारांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. स्वामीनाथन फाउंडेशनने ते दर वर्षी 15,000 रुपये केले आहे, तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ते वाढवून 12 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. या योजनेंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.

आपल्याला पैसे मिळाले कि नाही हे सांगतील ‘फार्मर्स कॉर्नर’, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in वेबसाइटवर सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. त्याच्या ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जाऊन, आपला आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे आपल्याला पैसे मिळाले कि नाही याची तपासणी करू शकता.

>> जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्यप्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने सेट केला गेला असेल तर त्याची माहितीही त्यात सापडेल.

हा हेल्पलाइन नंबर आहे
पीएम-किसान हेल्पलाईन 155261 किंवा पंतप्रधान-किसान योजनेच्या 1800115526 (टोल फ्री) वर संपर्क साधून आपले पैसे का आले नाहीत याची माहिती देखील मिळवू शकता. यासाठी दुसरा फोन नंबर (011-23381092) देखील देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment