उद्धव ठाकरेंना जनतेच्या पाठीत खंजीर खूपसल्याचेच फळ मिळालंय; अजय कुमार मिश्रांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीत आज भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि अजयकुमार मिश्रा हे दोन मंत्री दाखल झाले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मिश्रा यांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळालेलं आहे,”असे मिश्रा यांनी म्हंटले.

यावेळी केंद्रीयमंत्री मिश्रा यांनी कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या घरी भेट देत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपकडून कधीच सरकारी यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपवर आरोप करत आहेत. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे यावेळी मिश्रा यांनी सांगितले.

बिहार व महाराष्ट्रमध्ये भाजपाबरोबर राहून ज्यांनी निवडणुका लढवल्या व ज्यांच्या विरोधात त्या लढल्या गेल्या. आता त्याच पक्षांबरोबर त्यांनी आघाडी केली आहे. यामध्ये भाजपाचा काहीही दोष नसल्याचे मिश्रा यांनी सांगितले.