जयंत पाटील नाराज आहेत? अजितदादांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांच्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नाराज असून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत फूट पडली असल्याचं बोललं गेलं. या संपूर्ण वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

जयंत पाटील हे वरिष्ठ नेते असून अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह मंत्रालय सांभाळलं. ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादाच्या चर्चेत काहीच तथ्य नाही, असं सांगत अजित पवार यांनी पाटील-कुंटे वादावर पडदा टाकला.

या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं. माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे,” असेही अजितदादा म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment