धक्कादायक! मुलीच्या लग्नावरून परत येत असताना कुटुंबासोबत घडले असे काही की परीसर हळहळला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलीच लग्न करून घरी परतताना फॅमिली कारने रेलिंगला धडक दिली. यामध्ये कारमधील सासू-मुलगा आणि सून यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलीसह तीन जण जखमी झाले. आग्र्या जवळ परिसरातील उखरा रोड येथे राहणाऱ्या राजकुमार पराशरच्या मुलीचे शुक्रवारी तुंडला येथे लग्न झाले. शनिवारी सकाळी तुंडल्याजवळील चुल्हावली येथे लग्नानंतर हे कुटुंब दोन कारमध्ये घरी परतत होते. सकाळी साडेआठ वाजता एटमादपूर परिसरातील इनर रिंग रोडवरील रहाण कलांजवळ रस्त्याच्या कडेला अनियंत्रित कारने आरसीसी रेलिंगला धडक दिली. कारमध्ये सुमन पराशर (55) पत्नी राजकुमार, त्यांचा मुलगा सौरभ (30) आणि मुलगा मोहितची पत्नी गुंजन (वय 28) यांचा जागीच मृत्यू झाला.

मोहित, सौरभची पत्नी अंजली आणि विष्णूची पत्नी शालाविका हे जखमी झाले. पोलिसांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केले. थोड्या वेळाने राजकुमारही तिथे पोचले. अपघाताचे कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांना असा संशय आहे की कार चालवत असलेल्या सौरभला डुलकी आल्यामुळे अपघात झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजकुमार आणि त्यांची पत्नी आणि मुलगा बराच काळ आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करत होते. घरात आनंद होता. शुक्रवारी रात्री विवाहसोहळा यशस्वी झाला. शनिवारी सकाळी मुलीला निरोप दिला. यानंतर ते आपल्या घरी परतत होते. वाटेत कुटुंबातील तीन सदस्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर गोंधळ उडाला. राजकुमारांवर एकाच वेळी दु:खाचा डोंगर फुटला आहे. एकाच वेळी त्यांनी त्यांच्या परिवारातील 3 जणांना गमावले आहे.

Leave a Comment