रस्त्याअभावी आदिवासी भोगतायत मरणयातना; रुग्णांना उपचारासाठी डोलीने 7 किमीचा डोंगर करावा लागतोय पार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर प्रतिनिधी । संदीप साळवे

राज्याची राजधानी मुबंईपासून 100 किमी अंतरावर आणि पालघर जिल्ह्यातील जव्हारपासून 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाड, मनमोहाडी भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही नागरी सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. शिवाय रस्त्याअभावी अबाल वृद्ध गरोदर माता, शाळकरी मुले, चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी रुग्णास लाकडाची डोली करून 6 ते 7 किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते. बऱ्याचदा वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक रुग्ण उपचाराअभावी रस्त्यातच दगावले देखील आहेत. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार? असा प्रश्न विचारला जातो आहे

यामधील दखण्याचापाडा वडपाडा उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतमध्ये, मनमोहाडी ऐना ग्रामपंचायत तर भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या पाड्यांची ऐकूण लोकसंख्या चौदाशेच्या आसपास असून येथील एकूण 200 मुले पुढील शिक्षण घेत आहेत परंतु रस्ता नसल्याने शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. मनमोहाडी या पाड्याची 80 घरांची लोकवस्ती असून नदी ओलांडून त्यांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात येथील आदिवासींचा पूर्णपणे संपर्क तुटतो. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील आदिवासीं समोर कोणताच पर्याय उपलब्ध नसतो.

येथील ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अशा अनेक घटना वारंवार येथे घडत आहेत. तसेच मागील वर्षी वडपाड्याजवळ 25 लाखाचा आसपास खर्च करून दीड दोन किमीचा अंतराचा थातूर माथुर नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे त्या रस्त्यावर सर्वत्र गवत उगलय कामात कोणतीच कॉलेटी नाही मुळात या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने कुठे तरी थातूर-मातूरकाम करून निधी वाया घालवण्याचा नेमका उद्देश काय? यामुळे याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करायला हवी

देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष उलटली. या काळात देशात अनेक बद्दल झाले आधुनिकीकरण झाले अनेक गावांचे शहरात रुपांतर झाले अनेक राजकीय पक्षांकडून विकासाचे आश्वासन देण्यात आली अनेक निवडणुकांमध्ये गावात रस्ते बांधणार गावाचा विकास करणार अशी अनेक आश्वासने लोकप्रतिनिधी कडून देण्यात येतात यातूनच दरवर्षी नवीन रस्त्यासाठी कोट्यवधी चा निधी खर्च देखील केला जातो मात्र मुबंई राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार तालुक्यातील या आदिवासी पाड्यांना लोकप्रतिनिधी कडून प्रत्येक निवडणुकीला फक्त रस्त्याचे आश्वासन मिळाले परंतु पक्का रस्ता मात्र अजून पर्यत मिळालेला नाही ही बाब खेदाने म्हणावी लागेल.

केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्था काही ट्रिलियनपर्यंत नेणार असल्याचे सांगितले जात आहे. अशाच अनेक अर्थसंकल्पात आदिवासींना अनेक योजना जाहीर होतात…मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते परंतु प्रत्यक्षात मात्र ह्या योजना येथील आदिवासी पर्यत पोहचत नाहीत भ्रष्ट प्रशासन व ठेकेदारांच्या घशात घातल्या जातात. यामुळे ट्रिलियनपर्यंत अर्थव्यवस्था नेणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने येथील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही अपेक्षा येथील आदिवासी व्यक्त करतायत.

या आदिवासी पाड्यांच्या चारही बाजूने डोंगर असल्याने येथे कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. परंतु शासन जरी ऑनलाइन शिक्षण असं म्हणत असलं तरी येथील 200 विद्यार्थ्यांचा नेटवर्क अभावी शिक्षणाला मुकावं लागत आहे. ‘डिजिटल इंडिया’चा डंका पिटणाऱ्या केंद्र सरकारला येथील संतप्त आदिवासी विद्यार्थी जाब मागत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटी आहेत परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे सोयीसुविधा पासून वंचित आहेत दळणवळनाची सुविधा नाही इथे कॅशलेस व डिजिल इंडिया ढोल वाजवला जातो परंतु या आदिवासी पाड्यात नेटवर्क नसल्याने मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार? पेशंट झाल्यास डोली करून खांद्यावर पेशंट घेऊन डोंगर चढाव लागतोय लोकप्रतिनिधी इकडे फिरकत देखील नाही अशी आपबिती येथील आदिवासी बांधव सांगत असून नागरी समस्या सोडवल्या जाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

Leave a Comment