“युद्धबंदी उल्लंघन” केल्याबद्दल पाकिस्तानने वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याला बजावले समन्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालील भारतीय दलाच्या कथित युद्धबंदीच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानने बुधवारी भारतीय उच्चायुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावून आपला निषेध नोंदविला.मंगळवारी राखचिकरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या “अंदाधुंद आणि बिनधास्त गोळीबारात दोन महिला गंभीर जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने केला आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने असा आरोप केला आहे की भारतीय सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषा आणि वर्किंग बॉर्डर (डब्ल्यूबी) च्या जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांना जड आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी लक्ष्य केले.पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, २००३ च्या युद्धबंदी कराराचा सन्मान करण्यासाठी, या युद्धबंदीचे झालेलं उल्लंघन आणि अशा प्रकारच्या इतर घटनांची चौकशी करण्यासाठी आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment