धक्कादायक! औरंगाबादमध्ये सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये अग्नीवीर सैन्य भरती दरम्यान शहरात आलेल्या एका तरुणाचा मृत्यू (youth dies) झाला आहे. या भरतीदरम्यान तरुणांची फिटनेस टेस्ट घेतली जाते. यावेळी रनिंग करताना एका तरुणाला चक्कर आली. धावपट्टीवरच तरूण खाली (youth dies) कोसळला.आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच या तरुणाचा मृत्यू (youth dies) झाला.

काय घडले नेमके ?
औरंगाबादेत विद्यापीठ ग्राउंडवर सध्या अग्नीवीर सैन्य भरती सुरु आहे. या भरतीसाठी कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातील करण पवार हा 20 वर्षीय तरुण भरतीसाठी आला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाची भरतीदरम्यान रनिंग सुरु असताना या तरुणाला चक्कर आली आणि तो खाली कोसळला (youth dies). यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (youth dies) झाला.

औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नीवीरांची भरती सुरु (youth dies) आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची गर्दी लोटली आहे. मात्र आलेल्या तरुणांना राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची सोय नाही. हे तरुण रस्त्यावर किंवा मिळेल तिथे आडोसा पाहून झोपत आहेत. अशा प्रकारे रात्र काढल्यानंतर तरुणांना भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर