औरंगाबाद- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोन जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद- मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद मुंबई महामार्गावर एकाच दुचाकीवर तिघे जण प्रवास करत होते ‌ यावेळी त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तिन्ही तरुण गाडीवरून खाली पडले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

औरंगाबाद मुंबई महामार्गावर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामध्ये गणेश बाळू जाधव आणि नितीन अंबादास जाधव अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Comment