औरंगाबादेत संचारबंदीत हत्येचे सत्र सुरूच… रस्त्यावर उभ्या तरुणाला भोसकले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद:  रस्त्यावर गप्पा मारत उभ्या असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून त्याच्याच मित्रानि धारदार चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.हर्सूल पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मारेकरी मित्राला अटक केली. गेल्या महिनाभरात संचारबंदीत रात्रीच्या वेळेस हत्येची ही तिसरी घटना असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

यश सोमेश महेंद्रकर, वय-21 (रा.एन-11, सिडको) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर राज नामदेव जाधव वय-19 (रा.हर्सूल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी श्रीकांत सतीश शिर्के वय-21 (रा.मयूरपार्क) याने फिर्यादीत म्हंटले आहे की, मृत यश आणि आरोपी राज यांच्यामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होता. यश हा शनिवारी रात्री एस.बी.ओ.शाळेसमोर गप्पामारत उभा असताना, तेथे आरोपी आला व त्याने वाद घालत जवळील धारदार चाकू काढून चार वेळा यशच्या छातीत भोसकले. यश रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळतात आरोपी भेदरले त्यांनी दुचाकीवरून जखमी अवस्थेत यशला रुग्णालयात दाखल करून पळ काढला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.मृत्यू झाल्याचे कळताच आरोपी पसार झाला होता.पोलिसांनी मध्यरात्री आरोपीला अटक केली.त्याने जुन्या वादातून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment