औरंगाबाद: तीस कोरोना रुग्णांची नव्याने भर, दोघांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संसर्ग शहरात सध्या थोड्या प्रमाणात असला तरी, ग्रामीण भागात रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासात शहरात फक्त सात नवीन रुग्णांची भर पडली. तर ग्रामीण भागात 23 रुग्ण वाढले दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी 25 जणांना (मनपा7 ग्रामीण 18) सुट्टी देण्यात आली. आज पर्यंत 1 लाख 43 हजार 770 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 30 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 47 हजार 581 झाली आहे.

आजपर्यंत एकूण 3 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील मनोर येथील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा घाटीत तर वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथील 51 वर्षे रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सध्या 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Comment