माफी मागा अन्यथा तुमचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करीत आहे. परंतु याच दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

केंद्रीय मंत्री रतनलाल कटारीया यांच्या या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला असून रतनलाल कटारीयांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा ईशारा राज्यमंत्री बच्चू कडु यांनी दिला आहे.

यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणं चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरायची भाषा वापरत असालं तर मग आम्ही तुम्हाला मारायसाठी यायचं का ? असा सवाल बच्चू कडू यांनी केलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment