मोठी बातमी: विराट कोहलीला रोहित शर्माला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदावरून हटवायचे होते!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विराट कोहलीने टी 20 कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून अनेक मोठ्या बातम्या समोर येत आहेत. एका रिपोर्टनुसार, विराट कोहलीला आता भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा पाठिंबा नाही. विराट कोहलीच्या अनेक निर्णयांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मोठी बातमी अशी आहे की, विराट कोहलीने निवड समितीला असा प्रस्ताव दिला होता की त्यांनी रोहित शर्माला उपकर्णधारपदावरून काढून टाकावे. विराट कोहलीच्या विरोधात ज्युनियर खेळाडूंना मध्येच सोडल्याचीही चर्चा आहे.

वृत्तसंस्था पीटीआय मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, विराट कोहली निवड समितीकडे एक प्रस्ताव घेऊन गेला होता की, रोहितला वनडे संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकावे कारण तो 34 वर्षांचा आहे. त्याची अशी इच्छा होती की, एकदिवसीय संघाचे उप-कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवावे तर पंतला टी- 20 फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी दिली गेली पाहिजे. जे बोर्डाला आवडले नाही,” असे सूत्राने सांगितले.

विराट कोहलीने ज्युनियर खेळाडूंना मध्येच सोडले!
ज्युनियर खेळाडूंचा विचार केला तर कोहलीच्या विरोधात सर्वात मोठी तक्रार अशी आहे की, तो त्यांना कठीण काळात मध्येच सोडून देतो. दुसरा एक क्रिकेटपटू म्हणाला, “कुलदीप यादव ऑस्ट्रेलियामध्ये पाच विकेट्स घेतल्यानंतर प्लॅनच्या बाहेर आहे. ऋषभ पंत फॉर्ममध्ये नसतानाही असेच घडले. भारतीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करणाऱ्या सिनियर ज्येष्ठ गोलंदाज उमेश यादवला कोणीही दुखापत नसतानाही त्याच्या नावाचा विचार का केला जात नाही याचे उत्तर कधीच मिळाले नाही.

विराट कोहलीशी संवादाची समस्या
एका माजी खेळाडूने पीटीआयला अनौपचारिक संभाषणादरम्यान सांगितले,”विराटची समस्या संवाद आहे. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत, त्याची खोली चोवीस तास उघडी असायची आणि खेळाडू आत जाऊ शकायचे, व्हिडिओ गेम खेळू शकायचे, अन्न खाऊ शकायचे आणि गरज पडल्यास क्रिकेटबद्दल बोलूही शकायचे. मैदानाबाहेर कोहलीशी संपर्क साधणे खूप कठीण आहे.” माजी क्रिकेटपटू म्हणाला,”रोहितमध्ये धोनीची झलक आहे पण वेगळ्या प्रकारे. तो ज्युनियर खेळाडूंना रात्रीच्या जेवणासाठी घेऊन जातो, जेव्हा ते उदास असतात तेव्हा त्यांना पाठीवर थाप मारतो आणि त्याला खेळाडूंच्या मानसिक बाजूची जाणीव असते.”

Leave a Comment