मनसे सोबत युती करणार का?? आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे. सध्याची राज्यातील ऐकून परिस्थिती पाहता महाविकास आघाडी विरोधात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र हि शक्यता फेटाळली आहे

सांगली दौऱ्यावर असताना आशिष शेलार याना मनसे- भाजप युती विचारलं असता त्यावर त्यांनी स्पष्ट ‘नाही’ असं उत्तर दिलं. मुंबई महापालिकेत मनसे आणि भाजप एकत्र येतील, अशी चर्चा रंगली आहे. पण आता मनसेसोबत युती करणार नसल्याचं उत्तर शेलार यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली. नाना पटोले दरवेळी विनोदी वक्तव्य करतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले. त्यांचा कोर्डवर्ड अमजद खान ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. भरसभागृहात त्यांनी हे सांगितलं. त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य बदललं. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. आता विदर्भात गेले आहेत, वाटतं पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील.

Leave a Comment