आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या; चंद्रकांतदादांनी डिवचले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय प्रचाराचा धुरळा उडत असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा थेट सामना आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अस चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

भाजपने काल च शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे याना गळाला लावत थेट भाजप कडून उमेदवारी जाहीर केली. आज त्याच्या पक्ष प्रवेशासाठी चंद्रकांत पाटील नांदेड ला गेले होते. तेव्हा त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Leave a Comment