चेहरा भोळा आणि भानगडी सोळा ; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत भाजप आमदार अशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर तोफ डागली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, असं ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असं आशिष शेलार म्हणाले.

मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात 1 वाझे – फडणवीस

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकार वर निशाणा साधला. महाराष्ट्रात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला.

Leave a Comment