मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही; पण योगी पर्याय देत असतील तर गैर काय?- चंद्रकांत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, पण एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय ते आज (१ डिसेंबर) मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावर प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“बॉलिवूड किंवा असा कोणत्याही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, तो कुठेही नेण्याचं कारण नाही. एखाद्यावेळी ते अशाच प्रकारचा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा यासाठी अभ्यासासाठी येत असावेत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “पण मुंबईतून बॉलिवूड ते नेऊ शकत नाही. तसेच मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळणं फार अवघड आहे. पण एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,” असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (2 डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ 1 डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. ते 1 डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. यावेळी योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूड निर्मात्यांसोबत बैठक घेतील. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिरला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील. (Chandrakant Patil On Parallel Bollywood Industry in UP)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment