महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सतत टीका केली जात आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडीतील नेत्यांवर वारंवार निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. “ठाकरे पवार हे रावण सरकार आहे. या सरकारमधील घोटाळाबाजाच्या पुतळ्यांचे मी दहन करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे. 31 डिसेंबरपर्यंत अर्धे मंत्री आणि नेते हे तुरूंगात असणार आहेत. ” असे म्हणत सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधी जितेंद्र आव्हाड या रावणामधील एक राक्षस आहे. मी लवकरच राज्यपालांची भेट घेणार आहे. आणि विनंती करणार आहे की जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी. ठाण्यात सध्या काय सुरू आहे, एकीकडे प्रताप सरनाईक लुटत आहे तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड किडनॅपिंग करत आहे. यांना उद्धव ठाकरे व शरद पवार हे वाचविण्याचे काम करत आहेत. ठाकरे पवार हे रावण सरकार आहे. या सरकारमधील घोटाळाबाजाच्या पुतळ्यांचे मी दहन करणार आहे.

मी आता रविवारी सोलापुरला जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन दोन – चार जणांच्या संपत्तीसमोर सेल्फी काढणार आहे. त्या ठिकाणी मग कुठला सेल्फी फिट बसतो ते पाहणार आहे. आतापर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसलेले उद्धव ठाकरे यांचे 19 बंगल्याचे घेटाळे बाहेर काढले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे. हे काय धडाडणार, 31 डिसेंबरपर्यंत अर्धे मंत्री आणि नेते हे तुरूंगात असणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment