भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे; निलेश राणेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून आज गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी माझ्यावर गेल्या दोन महिन्यांपासून काही लोक पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. असे मलिक यांनी म्हंटले आहे. मलिकांच्या या दाव्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी ट्विट केले असून त्यांनी मालिकांवर निशाणा साधला आहे. “भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे,” अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “भंगार मलिक स्वतःला फार महत्त्वाचा माणूस समजायला लागला आहे. त्याच्यावर पाळत ठेवूण्या इतकं महत्त्व मलिकाचं नाही. चार दिवस टीव्हीवर दिसला म्हणून कोण लोकप्रिय होत नाही, माझं आजही म्हणणं आहे जी मलिकने भूमिका घेतली ती ड्रग माफियांना फायद्याची ठरली हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही,” असे राणे यांनी म्हंटले आहे.

आज काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या या खुलाशावर निलेश राणे त्यांनी घणाघाती टीका केली आहे. राणेंच्या या टीकेला मलिक आता काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

Leave a Comment