सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात सोशल मीडिया आणि काही माध्यमांत ठरवून मोहिम चालवली गेली- परमबीर सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी AIIMS रुग्णालयामधील डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालामध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला. त्यामुळं सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती.

AIIMS नेदेखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे परमबीर सिंह म्हणाले. अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण AIIMSच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.

मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र, AIIMSच्या अहवालानंतर सत्य अखेर समोर आलं. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. काही मीडियानंही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. १६ जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत असेही परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment