स्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दरदिवशी हजारो किमी पायपीट करत, सायकलवरून प्रवास करत कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी पोहोचू इच्छिणाऱ्या  स्थलांतरित कामगारांची छायाचित्रे समोर येत आहेत. दिवसेंदिवस या कामगारांचे हाल वाढत आहेत. आपल्या कविता, शेर, शायरी आणि लेखनाने भारतीयांवर भुरळ घातलेले गीतकार, लेखक गुलजार यांनी नुकतीच या कामगारांच्या अवस्थेवर एक हृदयस्पर्शी कविता लिहिली आहे. या कवितेत त्यांनी गावातील जीवनाचे वर्णन करीत तिथल्या जगण्याबद्दल वर्णन केले आहे. त्याबरोबरच शहरातील यांत्रिकताही शब्दबद्ध केली आहे. या कामगारांच्या वेदना आणि गावी जाण्याची ओढ याचे नेमके मर्म गुलजार यांनी या कवितेत मांडले आहे. 

कविता ऐकण्यासाठी – https://www.facebook.com/83332960200/posts/10163600272545201/

साथीचा आजार आला आणि सगळे कामगार आपल्या घरी जाऊ लागले. असं म्हणताना ते लिहितात की शहरातील यंत्रांमुळेच तर हातपाय चालत होते, जीवन तर गावातच पेरून आलो होतो . इथे शरीरालाकेवळ प्लग लावले होते. शहरे बंद झाली तसे हे प्लग काढून घेतले आणि शरीर बंद पडले. पण तिथेच मरू जिथे जीवन आहे. अशा भावनिक शब्दात त्यांनी ही कविता लिहिली आहे. अप्रत्यक्षरीत्या शहरामध्ये जगणं हरवून बसलेल्या केवळ यंत्रासारखे कोरडेपणाने राबणाऱ्या या कामगारांची मनस्थितीच जणू त्यांनी शब्दबद्ध केली आहे.

अन्न, पाण्याशिवाय आपल्या घरी नक्की पोहोचू या आशेने चालणाऱ्या या स्थलांतरित कामगारांच्या वेदना लोकांपर्यंत पोहोचवित असताना त्यांच्या भावना नेमक्या शब्दात मांडत गुलजार यांनी सर्वाना विचार करण्यास भाग पाडले आहे. अनेक वर्षे या कामगारांनी शहरे चालविली आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रगतीचा आणि सुखसोयींनीयुक्त जगण्याचा आनंद आपण घेतो आहोत. मात्र आज त्यांची ही अवस्था हृदयद्रावक चित्र दाखवत असल्याचे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले आहे.

गुलजार यांची संपूर्ण कविता –

महामारी लगी थी

घरों को भाग लिए थे सभी मज़दूर, कारीगर.
मशीनें बंद होने लग गई थीं शहर की सारी
उन्हीं से हाथ पाओं चलते रहते थे
वगर्ना ज़िन्दगी तो गाँव ही में बो के आए थे.

वो एकड़ और दो एकड़ ज़मीं, और पांच एकड़
कटाई और बुआई सब वहीं तो थी

ज्वारी, धान, मक्की, बाजरे सब.
वो बँटवारे, चचेरे और ममेरे भाइयों से
फ़साद नाले पे, परनालों पे झगड़े
लठैत अपने, कभी उनके.

वो नानी, दादी और दादू के मुक़दमे.
सगाई, शादियाँ, खलियान,
सूखा, बाढ़, हर बार आसमाँ बरसे न बरसे.

मरेंगे तो वहीं जा कर जहां पर ज़िंदगी है.
यहाँ तो जिस्म ला कर प्लग लगाए थे !

निकालें प्लग सभी ने,
‘ चलो अब घर चलें ‘ – और चल दिये सब,
मरेंगे तो वहीं जा कर जहां पर ज़िंदगी है !

[English Translation by Rakhshanda Jalil]

Migrants, COVID-19

The pandemic raged
The workers and labourers fled to their homes
All the machines ground to a halt in the cities
Only their hands and feet moved
Their lives they had planted back in the villages

The sowing and the harvesting was all back there
Of the jowar, wheat, corn, bajra – all of it
Those divisions with the cousins and brothers
Those fights at the canals and waterways
The strongmen, hired sometimes from their side and sometimes from this
The lawsuits dating back to grandparents and grand uncles
Engagements, marriages, fields
Drought, flood, the fear: will the skies rain or not?
They will go to die there – where there is life
Here, they have only brought their bodies and plugged them in!

They pulled out the plugs
‘Come, let’s go home’ – and they set off
They will go to die there – where there is life.

Leave a Comment