पुस्तक मागे घेतले नाही तर महाराष्ट्रात भडका उडाल्याशिवाय राहणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद प्रतिनिधी : आज आम्ही फक्त पुतळा जाळला आहे, जर त्यांनी हे पुस्तक मागे घेतले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात असा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी  युवक आणि युवती काँग्रेसकडून जयभगवान गोयल यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या जयभगवान गोयल लिखित पुस्तकात मोदींची आणि शिवाजी महाराजांची तुलना केली आहे. याचे तीव्र पडसाद महराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. उस्मानाबादेत जयभगवान गोयल यांच्या विरोधात घोषणा देऊन तसेच त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी जिल्हा युवक अद्यक्ष अमित शिंदे  उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की, प्रतिमा उंचावण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. स्वतःच्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारखा कायदा आणला जात आहे आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत.

ज्यावेळेस कथुआ येथील लहान मुलीवर अत्याचार होतो तेव्हा भाजप काही बोलत नाही, उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचाच एक आमदार सहभागी असतो तेव्हा काही बोलत नाहीत, असे प्रश्न उपस्थित करत सलगर यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी म्हंटले की, आपल्या नेत्याचे किती तळवे चाटावेत याच्या सर्व मर्यादा जयभगवान गोयल यांनी ओलांडल्या आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.

Leave a Comment