माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडण्यात आल्या आहेत असे बोलून स्वतः राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळून लावली आहे. सत्तार म्हणाले की, तुम्हाला ज्यांनी मी राजीनामा दिला असं सांगितलं त्यांना विचारून घ्या की मी राजीनामा दिला की नाही दिला. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तार लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. त्यानंतर या राजीनामा नाट्यावर सविस्तर बोलतील अस त्यांनी सांगितलं आहे. वेळ आल्यानंतर या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईन, अस देखील त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिक्रियेविषयी विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटल्यानंतर यावर बोलेलं अस त्यांनी सांगितलं.

Leave a Comment