सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३१४ वर गेला आहे. रविवारी देशात जनता कर्फ्यू लागून करण्यात आला आहे. मात्र अशात एक चांगली बातमी समोर येत आहे. दिल्ली येथे उपचार घेत असलेले १५ पैकी १३ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आता ठणठणीत बरे झाले आहेत.

इटालीच्या नागरिकांचा १५ जणांचा समुह ४ मार्च रोजी कोरोना पोझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर त्या सर्वांना दिल्ली येथील ITBP क्वारंटाईन सेवेतून हालवून वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये आयसोलेशन मध्ये ठेवले होते. आज त्या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्याने आनंद पसरला आहे.

दरम्यान कोरोनो विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. चीन च्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील २ लाखांहून अधिक जणांना शिकार बनवले आहे. भारतात आत्तापर्यंत कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण सापडले आहेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

Coronavirus Update | देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार | HM WhatsApp News Bulletin | 22 मार्च

Leave a Comment