नुकसान झालेलं पीक मनरेगा मार्फत काढा, एकनाथ शिंदेंची शासनाला मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी । राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्याची गरज असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यायाला हवी. तसेच पावसामुळे खराब झालेलं पीक काढणी करण्याकरिता कोल्हापूरप्रमाणे सुविधा उपलब्ध करावी. त्यासोबतच संपूर्ण राज्यात मनरेगा मार्फत हे खराब पीक काढण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर केला आहे. अशी माहिती शिवसेनेचे विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिंदे यांनी भिवंडी व शहापूर तालुक्यातील नुकसानग्रस्तांची पाहणी करत असताना पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे व नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना महसूल व कृषी विभागाला शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment