अमरावतीमध्ये अवकाळी पावसाने गहू पिकाचे मोठे नुकसान ; इतरही पिकांनाही मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा, कापूस सह संत्रा पिकाला फटका बसला. शेतकऱ्यांचा काढणीवर आलेला गहू अवकाळी पावसाने मातीमोल झाला आहे.

साइखेड शिवारातील प्रितेश गुजर याने 3 महिण्यागोदार दीड एक्कर शेतात गहू पिकाची लागवड केली. मात्र अवकाळी पावसामुळे गहू झोपलेला आहे. हातात आलेलं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला अपेक्षा आहे आता केवळ सरकारवर त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतं का याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment