गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा – सोनिया गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत.  त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.  दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे. सोनिया गांधी  पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीच्या रस्त्यावर हिंसाचार सुरु आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या. केंद्राच्या बरोबरीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि प्रशासनही या परिस्थितीला जबाबदार आहेत. केंद्रातल्या सर्वोच्च नेतृत्वाचे मौन पाहून धक्का बसला असे सोनिया गांधी म्हणाल्या.

दरम्यान दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या हिंसक वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला आहे.

Leave a Comment