जस्टीस लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी होणार? गृहमंत्र्यांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। जस्टीस लोया यांच्या मृत्यूप्रकरणाचं भूत भाजपच्या पुन्हा मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. या संशयित मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करणार असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. जर ठोस पुरावे असतील अन् कुणी तशी तक्रार केली तर राज्य सरकार न्यायाशीध ब्रिजगोपाल हरीकिशन लोया मृत्यूप्रकरणाची पुन्हा तपासणी करू असे देशमुख यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलआहे.

लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे १० वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. मात्र, गरज भासल्यास किंवा तशी तक्रार केल्यास ठाकरे सरकार या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडेल, असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.तसेच, कॅबिनेट कामगार मंत्री नबाव मलिक यांनीही याबाबत विधान केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही, ठोस पुराव्यानिशी कुणी तक्रार दाखल केली तर याप्रकरणाच्या चौकशीची गरज असल्याचे म्हटले होते, तेच गृहमंत्र्यांनी म्हटल्याचे नवाब यांनी सांगितले.

जस्टीस लोया यांचा नागपूरमध्ये एका लग्नसमारंभाला गेले असता, शासकीय निवास्थानी त्यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी अगदी संशियितरित्या त्याचा मृतदेह कुटूंबाला न कळवता त्यांच्या गावी नेऊन अतिमसंस्कार करण्यात आले होते. पोलीस तपासात त्यांच्या मृत्यूचे कारण ह्रिदयविकार असल्याचं सांगितलं गेलं होत. योगायोग म्हणजे लोया सोहराबुद्दीन केसची सुनावणी करत होते. या केसमध्ये भाजपचे अमित शहा हे आरोपी होते. यानंतरच्या काळात याप्रकरणात अमित शहा याना क्लीन चिट मिळाली आहे.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment