देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे अयोग्य – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशातील सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे योग्य नाही असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनता हिंदू असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी हे मत व्यक्त केले. आठवले यांनी म्हंटले की, सर्वजण हिंदू आहेत असे म्हणणे योग्य नाही. एक काळ असा होता की आपल्या देशात प्रत्येकजण बौद्ध होता. हिंदू धर्म आला की आम्ही हिंदू राष्ट्र बनलो. जर त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपला आहे तर ते चांगले आहे.

 

हैद्राबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिबीर सुरु आहे. त्या शिबिरात मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनता हिंदू असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Leave a Comment