हुश्श! निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका आणखी कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दहशतीचं सावट घेऊन आलेलं निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी मुंबईत धडकण्यापूर्वीच ते ५० किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. परिणामी या चक्रीवादळाचा मुंबई शहराला असणारा धोका हा आणखी कमी झाला आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली.

निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोन इतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ जितक्या वेगानं तयार झालं आहे. तितक्याच वेगानं ते शमण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळं आतापर्यंत एकही वादळ मुंबईला धडकलेले नाही, हे वादळही थेट मुंबईला धडकत नाही. असं ते म्हणाले.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाची दिशा ही दक्षिणेकडे सरकल्यामुंळं मुंबई शहरावरील धोका कमी झाला आहे. असं असलं तरीही प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार अलिबागपासून अवघ्या ९५ किलोमीटर अंतरावर हे वादळ पोहोचलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईपासून हे वादळ काहीसं दूर गेलं असलं तरीही पालघर, नाशिक, पुणे, उत्तर महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्येही त्याचे परिणाम दिसणार आहे. वादळामुळे या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment