बाळासाहेबांची शिकवण शिवसेना विसरली – रविशंकर प्रसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्रातील अनपेक्षित सत्तास्थापनेनंतर सर्वच स्तरांतून विविध प्रतिक्रिया येत असून केंद्रातील भाजपचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने भाजपसोबत असलेल्या युतीचा आणि मिळालेल्या स्पष्ट जनादेशाचा सन्मान केला नाही असं म्हणत रवीशंकर प्रसाद यांनी आज स्थापन झालेलं सरकार महाराष्ट्राला दिशादर्शक वाटेवर पोहचवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

अनेक राज्यांमध्ये स्थिर सरकार दिलं असल्यामुळे महाराष्ट्राला काय अपेक्षित होतं याची जाणीव आम्हाला होती. अजित पवारांनी स्थिर सरकारची गरज ओळखून दिलेला पाठिंबा अनेकांना झोंबणारा असला तरी मी मात्र या निर्णयाने कमालीचा सुखावलो असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत.

Leave a Comment