सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हटलं. मात्र, मुबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. या निर्णयावर राज्याचे महाधिवक्ता, पोलीस आयुक्त बोलू शकतील. पण महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. राज्याची एक मोठी परंपरा आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्याने आतापर्यंत कोणाचाही अपमान केलेला नाही”.

“मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं षडयंत्र आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे तपास केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. जर आपल्याच राज्यातील राजकारणी त्यांच्याविरोधात बोलत असतील तर ते खच्चीकरण करत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment