संचारबंदीत घरासमोरील दुचाकी समाजकंटकांनी जाळली; पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | सध्या शहरात कडक लॉकडाऊन सुरू असताना एका भाजी विक्रेत्याची घरासमोर उभी दुचाकी समाजकंटकांनी जाळल्याची घटना मध्यरात्री दोन च्या सुमारास संजयनगर भागात घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संजयनगर बायजीपुरा येथील फिरोज शेख यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांचा धंदा बंद आहे. रात्री जेवण केल्यानंतवर शेख यांचा संपूर्ण परिवार झोपी गेला होता. मात्र मध्यरात्री 3 च्या सुमारास अचानक घरात धूरांचे लोट येत असल्याने शेख यांना जाग आली.त्यांनी बाहेर जाऊन पाहिले असता घरासमोर लावलेली त्यांची दुचाकी जळत होती.

त्यांनी पाणीच्या साहाय्याने दुचाकीला लागलेली आग विझवली मात्र तो पर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती.लॉक डाऊन मध्ये सर्वत्र पोलिसांची गस्त असताना समाज कंटकांनी दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment