अमरावती जिल्ह्यात 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्चला मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । जिल्ह्यातील एकूण 526 ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान; तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते  13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.

मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल. जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: अमरावती- 46, मोर्शी-39, धामणगाव रेल्वे- 53,  चांदूर रेल्वे -28, तिवसा- 27, अंजनगाव सुर्जी- 34, वरूड- 41, भातकुली- 34, चांदूर बाजार- 41, दर्यापूर- 48, चिखलदरा- 17, अचलपूर- 42, नांदगाव खंडेश्वर- 44, धारणी- 32 अशी आहे.

Leave a Comment