तर अण्णा तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही – संदीप क्षीरसागर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी |  शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 50 कोटी देऊन मंत्रिपद मिळवले असल्याचा धक्कादायक आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या सभेत केला आहे. तेव्हा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर काका पुतणे आमने-सामने आले आहेत. ते शिवस्वराज्य यात्रेच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी आक्रमकपणे गंभीर आरोप करत ‘सामाजिक कार्यक्रमात तुम्ही राजकारण करत असाल तर अण्णा तुमचे फाडल्याशिवाय राहणार नाही ‘ असा धमकी वजा ईशारा जयदत्त क्षीरसागर यांना संदीप क्षीरसागर यांनी दिला..यामुळे पुन्हा एकदा क्षीरसागर घराण्यात संपतीचा वाद आणि सत्ता संघर्ष पेटला आहें.

पुढे बोलतांना संदीप क्षीरसागर म्हणाले की, ‘आमच्या काकांनी 50 कोटी रूपये देऊन मंत्रिपद घेतले. इतके पैसे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरा बदलला असता. सत्तेचा वापर संपत्ती जमवण्यासाठी केला म्हणूनच देशासह परदेशातही जयदत्त आणि भारतभूषण या दोन्ही भावांनी संपत्ती आहे असा आरोप करत संपतीच्या वाटण्या झाल्या त्यावेळी 2 कोटीचे कर्ज आमच्या वाट्याला दिले.’

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री प्रकाश सोळंके , रुपाली चाकणकर यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.

 

Leave a Comment