देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या अनेक निर्णयाबद्दल लोकांमधून असंतोष निर्माण होता ना आपण पहिले आहे. अशाच प्रकारचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असून त्या निर्णयामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते अशाच लोकांना राज्याच्या पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदूळ अल्प दारात पुरवले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाला आता तुगलकी निर्णय म्हणून संबोधले जाते आहे.

शरद पवारांचे जवळचा नातेवाईक आणि राष्ट्रवादी आमदार असणारा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

आधीच सरकार पूरग्रस्तांना मदत पुरवण्यास अपयशी ठरले आहे अशी सांतापाची लाट पुरग्रस्तांमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या या अध्यादेशाने लोक अधिकच संतापलेले आहेत. दोन दिवस ज्यांच्या घरात पाणी होते. अशा लोकांनाच १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ दिले जातील असा अजब अध्यादेश फडणवीसांनी काढला आहे. त्यावर सरकारची आम्हाला भीक नको आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या सर्व प्रकारावर पूरग्रस्तांनी दिली आहे.

श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला पूर स्थितीच्या मुद्द्यावर चांगलेच धारेवर धरले आहे. सरकार पूर परस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना फोन करण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप उशीर केला अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

Leave a Comment