लोकसभा अध्यक्षांची मोदींना वाटते भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकी नंतर सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे पंतप्रधान कोण होणार. पंतप्रधान शपथ घेताच लोकसभेच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरु होते. दरम्यान काल लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकसभेच्या अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक केले. मात्र त्यांनी नवनिर्वाचित सभापतींच्या एका गुणांबद्दल भीती देखील व्यक्त केली आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे अत्यंत नम्र स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नम्रपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये अशी भीती मला वाटते असे नरेंद्र मोदी आपल्या लोकसभेतील भाषणावेळी म्हणाले होते. या प्रसंगी नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या स्वभाव गुणांचा उल्लेख करून सामाजिक कार्यात बिर्ला कसे पुढे असतात याचा देखील वस्तुपाठ लोकसभेपुढे मांडला. त्याच बरोबर त्यांनी बिर्ला हे शेतकरी पुत्र आहेत असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले.

ओम बिर्ला हे २००३ , २००८, २०१३ अशा तीन राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोट्यातूनच आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकीत ते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. भाजपचे निष्ठावान नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याच प्रमाणे लोकसभा सभापती पदाचा जुना संकेत मोडून नवा पायंडा पाडण्यासाठी मोदी शहा जोडीने ओम बिर्ला यांची या पदी निवड केली आहे.

Leave a Comment